"ज्यांना शक्य होईल त्यांनी आपला देश सोडून जावे. काय ठेवलं आहे आपल्या देशात ? अन्याय, बेरोजगारी, हुकूमशाही सरकार, मुस्कटदाबी, सक्तीची राष्ट्रीय सेवा, ती नाही केली तर तुरुंगवास, महागाई, उपासमार रोगराई... ही यादीच संपत नाही. एखाद्या देशात जे काही नसायला पाहिजे तेच आपल्याला इथे सहन करावे लागते. हल्ली लिबियामार्गे बोटींनी युरोपला घेऊन जाणारे लोक आहेत. एकदा युरोपमध्ये पाय ठेवला की मानवतावादी दृष्टिकोनातून आश्रय देतात. तिकडे लहानसहान नोकऱ्या सहज मिळतात; कारण तिकडच्या लोकांना हलकीसलकी कामे करायला आवडत नाही. तिकडे मिळणाऱ्या पगारात आपण आरामात राहून घरी पैसे पाठवू शकतो. जुलमी राजवटीमुळे देश सोडला, असे म्हटले तर निर्वासित दर्जा देखील मिळतो. तसे झाले तर नोकरी मिळेपर्यंत निर्वाह भत्ता आणि राहायला आसरा मिळतो.'आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्याहून भूमध्य समुद्रातून मोडकळीस आलेल्या लहान बोटींमधून अत्यंत धोकादायक प्रवास करून युरोपला जाताना गेल्या पाच वर्षांत सुमारे १५००० लोक मृत्युमुखी पडले. तरीही तिकडे जाणाऱ्यांचा ओघ थांबलेला नाही. स्थलांतरितांच्या आयुष्यात पदोपदी घडत असणाऱ्या हृदयद्रावक सत्य घटनांवर आधारित नाट्यमय, कादंबरी. माहितीपूर्ण आणि उत्कंठावर्धक कादंबरी.
please login to review product
no review added